Government Benefit For Farmers In Maharashtra: नवे कृषी मंत्र्यांचे शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला योजना’ मोठे निर्णय नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कृषी विभागातील “मागेल त्याला योजनां” मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ घ्यावा अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
ही माहिती तुम्हाला भविष्यामध्ये नक्की उपयोगी पडणारे आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत..
ही महत्त्वाची माहिती तुमच्या इतर मित्रांना शेअर करा 👍👍
Government Benefit For Farmers In Maharashtra
Magel Tyala Yojana 2023
महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘ मागेलं त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे.
त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल.
मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच आशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा.
त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी कालावधीची व सोपी करावी, अशी सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
मित्रांनो कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर श्री मुंडे यांनी मंत्रालयात कृषी विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये आढावा घेताना ते बोलत होते.Government Benefit For Farmers In Maharashtra
बैठकीला प्रधान सचिव एकनाथ डवळे, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर आदींसह कृषी विभागाचे संचालक उपस्थित होते.
पिक विमा योजना 2023
कृषी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्याच्या सूचना देत मंत्री श्री मुंडे म्हणाले की एक रुपया भरून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे.Government Benefit For Farmers In Maharashtra
शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी अंतिम मुद्दतीची प्रतीक्षा करू नये, शेतकऱ्यांनी सध्याची परिस्थिती बघता जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावे.
शेतकरी संख्या वाढवण्यासाठी विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनजागृतीची मोहीम राबवून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी करून घ्यावे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली.Government Benefit For Farmers In Maharashtra
💁अधिक माहितीसाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈
दुबार पेरणीचे संकट नियोजन
मंत्री श्री मुंडे पुढे म्हणाले की राज्यातील पर्जन्यमानाचे परिस्थिती बघता काही भागात दुबार पेरणीचे संकट होण्याची शक्यता आहे. विभागाने तालुका न्याय दुबार पेरणीचा अहवाल तयार ठेवावा.Government Benefit For Farmers In Maharashtra
तसेच पीक पेरणीची माहिती ही तालुका निहाय द्यावी. दुबार पेरणीच्या संकटासाठी विभागाने सज्ज असावे. राज्याच्या उत्पन्नात कृषीचा वाटा वाढवून दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे. त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा मनोदय कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
नमो शेतकरी महा सन्मान योजना
- नमो शेतकरी महा सन्मान योजना राज्य शासन 6000 रुपये देणार आहे.
- केंद्र व राज्याचे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्षी मिळणार आहेत.
- यामध्ये राज्याच्या हिश्याचे खरीप हंगामापूर्वी 3000 रुपये
- रब्बी हंगामा पूर्वी 3000 रुपये अशा दोन टप्प्यात देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा.
- विभागांतर्गत 13 योजना 100% केंद्र पुरस्कृत राबवल्या जातात.
- केंद्र पुरस्कृत योजना मधील लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे.
- जेणेकरून केंद्र शासनाचा अधिक अधिक निधी राज्याला प्राप्त होऊन शेतकऱ्यांना लाभ देता येणे शक्य होईल. Government Benefit For Farmers In Maharashtra
हे पण वाचा…👉 💁नमो शेतकरी योजने संदर्भात 👉येथे क्लिक करा 👈
मित्रांनो बैठकीत पीक पेरणी व प्रजन्यमानावर चर्चा करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यातील पर्जन्यमानाचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच सध्या परिस्थितीत शेती पुढील आव्हाने, व भविष्यात शेतीसाठी राबवायचे उपक्रम याविषयी विस्तृत चर्चा करण्यात आली.
💁व्हिडीओ पाहण्यासाठी 📒
👉येथे क्लिक करा 👈
मित्रांनो हे राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना नक्की विविध योजनेच्या फायदा सुद्धा होणार आहे आणि भविष्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होणार आहेत….
तुम्हाला ही वर दिलेली माहिती नक्की उपयुक्त वाटली असेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा…